चक्रीवादळामुळे दिवाळीत पुन्हा जोरदार पाऊस..तोडकर हवामान अंदाज
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
15 ऑक्टोबरच्या आसपास सांगली, धाराशिव, पुणे आणि अहमदनगरसह काही भागांमध्ये पाऊस झाला असला तरी, महाराष्ट्रातील 80% भाग हा कोरडा होता. महत्त्वाची सूचना म्हणजे 17, 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी राज्यात हवामान जवळपास सामान्य आणि कोरडे राहील. एखाद्या ठिकाणी ढगाळ वातावरण होऊन हलकासा पाऊस पडण्याची शक्यता असली तरी, 99% महाराष्ट्र कोरडा राहण्याचा अंदाज आहे अशी माहिती तोडकर यांनी दिली आहे.
मात्र, 20 ऑक्टोबरपासून वातावरणात बदल होऊन वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. 20 तारखेला कोल्हापूर, रत्नागिरी, तसेच पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगर घाट भागात जोरदार पाऊस अपेक्षित आहे, ज्यात बेळगावचाही समावेश आहे. याशिवाय, 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये, विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे परिसरासह बीड जिल्ह्यामध्ये ‘भाग बदलत’ पद्धतीने पाऊस होण्याची शक्यता आहे. 21 ऑक्टोबरच्या संध्याकाळनंतर लातूर आणि नांदेडच्या तुरळक भागांतही पावसाची नोंद होऊ शकते. (तोडकर हवामान अंदाज)
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
पुढील तीन दिवसांत, म्हणजेच 22, 23 आणि 24 ऑक्टोबरच्या आसपास, एका संभाव्य चक्रीवादळाचा प्रभाव प्रामुख्याने मराठवाड्यावर दिसून येईल. वाऱ्याचा वेग जास्त राहिल्यास, हा प्रभाव 21 ऑक्टोबरपासूनही सुरू होऊ शकतो. 22 तारखेनंतर लातूर, सोलापूर, सांगली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान मॉडेलनुसार व्यक्त करण्यात आली आहे, ज्यात सध्या दक्षिण महाराष्ट्र आणि पूर्व मराठवाड्याची परिस्थिती अधिक सक्रिय दिसत आहे असे तोडकर म्हनाले…
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर, शेतीचे नियोजन आणि पेरणी योग्य वेळेतच करावी. सध्या केवळ 20-25% हवामान प्रणाली सक्रिय असल्याने, 80-90% क्षेत्र कोरडे आहे. दर 15 दिवसांनी किंवा महिन्याला पावसाची शक्यता मिळत असल्याने, पेरणी थांबवणे योग्य नाही. 5-6 नोव्हेंबरच्या आसपासही पावसाचे वातावरण बनू शकते. त्यामुळे, शेती हा धोकादायक धंदा (रिस्कली बिझनेस) मानून, योग्य वेळी नियोजन करणे महत्त्वाचे आहे असे तोडकर साहेबांनी सांगितले आहे.