चक्रीवादळ येनार ; या तारखेपासून पुन्हा जोरदार पाऊस… तोडकर हवामान अंदाज
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
१६ ते २१ ऑक्टोबर या दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी वातावरण अनुकूल राहील. या काळात मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. १६ ऑक्टोबर (आज) पुणे क्षेत्रात पाऊस सक्रिय राहील, तर छत्रपती संभाजीनगर (२०-२५% व्याप्ती), नाशिकच्या पूर्व भागात, तसेच लातूर आणि नांदेड पट्ट्यात स्थानिक वातावरणानुसार तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. १७ ऑक्टोबरला मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होऊन हवामान स्थिर राहील अशी माहिती तोडकर यांनी दिली आहे.
बंगालच्या उपसागरात १९ किंवा २० ऑक्टोबरच्या सुमारास चक्रीवादळ पूर्णपणे तयार होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव थेट दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यावर पडेल. २० ऑक्टोबरपासून कोकण किनारपट्टी (रत्नागिरी), कोल्हापूर, पुणे आणि सांगली या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा आहे. त्यानंतर २१ किंवा २२ ऑक्टोबरला सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यासह नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, लातूर आणि सोलापूर येथे पुन्हा जोरदार पावसाचे आगमन होईल असेही तोडकर म्हनाले..
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
२२, २३, आणि २४ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात दक्षिणेकडील साईडला आणि मराठवाड्यावर पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात तेलंगणा, छत्तीसगड आणि कर्नाटक बॉन्ड्री लगतच्या जिल्ह्यांना (जसे की सांगली, सोलापूर, बीडचा दक्षिणेकडील भाग, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर) सर्वाधिक धोका आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हा पाऊस अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. हा संभाव्य पाऊस हरभरा आणि ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरू शकतो, तसेच पेळणीच्या कामात मोठे अडथळे निर्माण करू शकतो. (तोडकर साहेब)
🧑🌾 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
शेतकऱ्यांनी १६ ते २० ऑक्टोबर या हवामान स्थिरतेच्या कालावधीचा फायदा घेऊन आपली नियोजित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. २२ ऑक्टोबरनंतर येणाऱ्या पावसाचा धोका आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी ही कामे वेळेत करणे आवश्यक आहे. #तोडकर