दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
शेतकऱ्यांना दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसान भरपाईचे पैसे दिले जानार आहेत. सध्या NDRF च्या निकषानुसार नुकसान भरपाई वाटत सुरू आहे आणि लवकरच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली 10000 रूपयांची वाढीव मदत देण्यात येनार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेली नुकसान भरपाईची रक्कम अत्यंत कमी (तुटपुंजी) आसल्याने शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या भावना योग्य असल्याचे मान्य केले आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
शेतकऱ्यांच्या रोषावर प्रतिक्रिया देताना कृषिमंत्री भरणे म्हणाले, “शेतकऱ्यांची भावना रास्त आहे. सध्या दिलेली मदत ही NDRF च्या निकषांप्रमाणे पहिला हप्ता आहे. ही रक्कम शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही हे मी मान्य करतो.”
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
“पहिला हप्ता जरी कमी असला तरी, मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली वाढीव मदतीची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. हा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचा रोष नक्कीच कमी होईल आणि त्यांना थोडा दिलासा मिळेल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
शेतकरी सध्या अडचणीत असल्याचे मान्य करत कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले की, ते स्वतः बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी झाले आहेत. “महाराष्ट्र शासन या कठीण काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी धीर धरावा, त्यांना लवकरच वाढीव मदत मिळेल,” असे आवाहनही त्यांनी केले.