राज्यातील या भागात वादळी पाऊस झोडपनार, या तारखेपासून – गजानन जाधव
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
गजानन जाधव (व्हाईट गोल्ड ट्रस्ट) यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, १३ ऑक्टोबर रोजी मान्सूनने राज्यातून निरोप घेतला असल्याने सध्या संपूर्ण राज्यात कोरडे हवामान आहे. मात्र, ही परिस्थिती लवकरच बदलणार असून १५ ऑक्टोबरपासून राज्याच्या हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.
प्रभावित क्षेत्रे: विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र.
स्वरूप:या भागांमध्ये प्रामुख्याने ढगाळ हवामान राहून दुपारनंतर काही ठिकाणी वादळी पाऊस अपेक्षित आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
तीव्रता: सध्याच्या अंदाजानुसार, वादळी पावसाचे प्रमाण विदर्भ आणि मराठवाड्यात थोडे जास्त राहू शकते. खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
साप्ताहिक अंदाज: सोमवारपासून रविवारपर्यंत म्हणजेच पुढील सात दिवस याच पद्धतीचे हवामान कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला काळजी घेणे आवश्यक – गजानन जाधव
सोयाबीन काढणी: शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबरपूर्वी शक्य असल्यास सोयाबीनची काढणी करावी.
काढणी केलेले पीक: जर सोयाबीन काढले नसेल किंवा शेतात पसरलेले असेल, तर ते जमा करून उंच जागी गंजी मारून झाकून ठेवावे.
पिकांचे संरक्षण: १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान कुठल्याही पिकाचा पसारा शेतात न ठेवता तो गोळा करून झाकून ठेवावा.
रब्बी पेरणी: सध्या रब्बी पिकांच्या (उदा. हरभरा किंवा गहू) पेरणीची घाई न करता, दिवाळी होईपर्यंत पेरणी तूर्त टाळणे योग्य राहील, असा सल्लाही गजानन जाधव यांनी दिला आहे.