रामचंद्र साबळे अंदाज ; राज्यात जोरदार पावसाचा अलर्ट, चक्रीवादळाची ताजी अपडेट
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
महाराष्ट्रावरील हवेचे दाब आज व उद्या (ता.१९, २०) कमी होऊन ते १००६ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील, जेथे हवेचे दाब कमी राहतील, तेथे मोठ्या प्रमाणात ढग जमून पावसाची शक्यता निर्माण होईल.
मंगळवारपासून शनिवार (ता.२१ ते २५) पर्यंत हवेच्या दाबात वाढ होऊन ते १०१० हेप्टापास्कलपर्यंत वाढतील. त्यामुळे वाऱ्याला प्रतिबंध होऊन दिवाळीत पावसाची शक्यता कमी राहील असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
सध्या हिंदी महासागराच्या व बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असून, मोठ्या प्रमाणात बाष्पनिर्मिती सुरू आहे. त्यामुळे ढगांचा मोठा समूह हिंदी महासागरावर व बंगालच्या उपसागरावर जमलेला असून, दक्षिण भारताच्या दिशेने येत आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
महाराष्ट्रावरील हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ढग जमा होऊन पावसाची शक्यता वाढली आहे. त्याशिवाय प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान अतिथंड झाल्याने पेरूजवळ ते केवळ १४ अंश सेल्सिअस आणि इक्वेंडोरजवळ ते २१ अंश सेल्सिअस इतके कमी राहण्यामुळे तेथे हवेच्या दाबात वाढ झालेली आहे. वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहण्याने दक्षिण भारतावर मोठ्या प्रमाणात ढग जमा होऊन ‘ला-निना’च्या परिणामाने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आज व उद्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील. (डाँ.रामचंद्र साबळे)
दिवसेंदिवस हवामान बदलाचे परिणाम वाढत असून, या वर्षी हिमालयात अधिक बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातही थंडीचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या काळात अतितीव्र थंड हवामान जागवेल. याच काळात अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहतील अशी माहिती साबळे यांनी दिली.
आज (ता.१९) विषुववृत्तीय भागात चक्रीवादळाची निर्मिती होऊन ते वादळ अरबी समुद्रातून ओमेनच्या दिशेने गुरुवारी (ता. २३) पुढे जाईल. यापुढेही असे हवामान बदलाचे परिणाम नोव्हेंबरपर्यंत जाणवतील असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.