हरबरा पेरणी करताना हे तननाशक वापरा, गवत उगवनारच नाही
हरभरा हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे रब्बी पीक आहे, ज्याचे चांगले उत्पादन घेण्यासाठी तण नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक ठरते. तणामुळे हरभरा पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट येते. तणे मुख्य पिकाशी पाणी, पोषक घटक यांसाठी स्पर्धा करतात, ज्यामुळे पिकाची वाढ खुंटते.
हरभरा पिकाच्या वाढीच्या सुरुवातीचे पहिले ४५ दिवस तण-स्पर्धेच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील असतात. त्यामुळे या महत्त्वाच्या कालावधीत प्रभावी तण नियंत्रण करणे गरजेचे आहे, अन्यथा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असते.
पेरणीनंतर 48 तासात हे तननाशक
हरभरा पिकामध्ये तणांचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी पेरणीनंतर त्वरित रासायनिक तणनाशकाचा वापर करणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. पेरणी झाल्यावर परंतु तण आणि पिक उगवण्यापूर्वी (Pre-emergence) ४८ तासांच्या आत तणनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे.
यासाठी पेंडीमिथॅलीन (Pendimethalin) ३०% ईसी घटक असलेले तणनाशक वापरले जाते. याची फवारणी करतेवेळी जमिनीत पुरेसा ओलावा (ओल) असणे अनिवार्य आहे, अन्यथा तणनाशक प्रभावी ठरत नाही. साधारणपणे, ७०० मिली पेंडीमिथॅलीन प्रति एकर १५० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हे तणनाशक तणांची उगवण होण्यापूर्वीच त्यांना नष्ट करते…
पेंडामेथालीन 30% ईसी (Pendimethalin 30% EC) घटक आसलेल्या बाजारातील काही प्रमुख तणनाशके आणि त्या उत्पादक कंपन्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
| तणनाशकाचे नाव (उत्पादन) | कंपनीचे नाव (उत्पादक) |
| पनिडा (Panida) | टाटा रॅलीस (Tata Rallis) |
| धनूटॉप (Dhanutop) | धनुका (Dhanuka Agritech) |
| दोस्त (Dost) | यूपीएल (UPL) |
| गदर (Gadar) | एचपीएम (HPM) |
| पेंडामिल (Pendamil) | आयआयएल (IIL – Insecticides (India) Ltd.) |
| पेंडिफिक्स (Pendifix) | जीएसपी (GSP Crop Science Private Limited) |
| पेंडी (Pendi) | स्वॉल (Swal Corporation) |
| स्ट्रॉम+ (Strom+) | रेन बायो-टेक इंडस्ट्रीज (Rain Bio-Tech Industries) |
| पॅन्डोल (Pandol) | जय श्री राम ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड (Jai Shree Ram Agro Private Limited) |
रासायनिक नियंत्रणासोबतच यांत्रिक (Mechanical) आणि एकात्मिक (Integrated) तण नियंत्रणाचे उपाय करणे पिकासाठी अधिक फायदेशीर ठरते. हरभरा पिकामध्ये पेरणीनंतर २० दिवसांनी पहिली कोळपणी आणि ३० दिवसांनी दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने तणांचा नाश होतो, तसेच जमिनीत हवा खेळती राहते आणि ओल टिकून राहण्यास मदत होते.
कोळपणीनंतर दोन रोपांमधील तण काढण्यासाठी किमान एक वेळा खुरपणी करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे एकात्मिक व्यवस्थापन केल्यास हरभरा पिकाचे उत्पादन निश्चितपणे वाढेल…
















